Sunday, October 4, 2015

फसवणूक

गणिताच्या क्षेत्रात एकापेक्षा एक अवघड, महत्वाचे परंतु न सुटलेले प्रश्न अस्तित्वात आहेत. मात्र जवळपास सर्व गणित्यांचे एकमत आहे की "रिमानचा तर्क" हा सर्वांत महत्वाचा न सुटलेला प्रश्न आहे. इ.स.१८५९ मध्ये बर्नहार्ड रिमान या गणित्याने हा तर्क मांडला होता आणि अगदी १५० वर्षे होऊन गेल्यानंतरदेखिल हा प्रश्न सुटलेला नाही.

जी.एच. हार्डी

 प्रसिद्ध इंग्लिश गणिती जी.एच. हार्डी यांचे सतत देवासोबत भांडण चालू असायचे असे म्हटले जाते. एकदा उन्हाळ्याची सुट्टी डेन्मार्क मध्ये हॅराल्ड बोर याच्याबरोबर व्यतित केल्यानंतर घरी परत जाताना त्यांना लक्षात आले की त्यांना एका छोट्या बोटीने उत्तर समुद्रातून इंग्लंडला परत जावे लागेल. उत्तर समुद्र हा वादळी आणि धोकादायक प्रवासासाठी प्रसिद्ध आहे. या बोटीवर चढण्याआधी हार्डी यांनी मित्र बोर याला एक पत्र पाठवले : "मी रिमानचा तर्क सोडवला आहे. - हार्डी".

अत्यंत उत्साहात बोरने हार्डींना पत्र पाठवले आणि त्याबद्दल अधिक विचारणा केली. त्यावर हार्डींनी उत्तर पाठवले: "अच्छा ते होय? ते फक्त माझा जीव वाचवण्यासाठी होते. असे खोटे श्रेय माझ्या नावावर ठेऊन देव मला मरू देणार नाही हे मला नक्की ठाऊक आहे!"

3 comments:

  1. रिमान चा तर्क काय आहे?

    ReplyDelete
    Replies
    1. I think I cannot explain that in simple enough language. I may do that if you have some background in complex analysis and some familiarity about analytic continuation. You may search for "Riemann Hypothesis" on Wikipedia if you wish.

      Delete
  2. Hahaha... Changli shakkal ladhavali shriyut Hardi..

    :-P

    ReplyDelete